Waqf Bill : वक्फ विधेयकाला काँग्रेस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती


नवी दिल्ली : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि द्रविड मुणेद्र कडघम (डीएमके) यांच्या मांदियाळीत आता काँग्रेसही जावून बसली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजुर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला (Waqf Bill) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काँग्रेसने चालवली असून काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत याबाबत सुतोवाच केले आहे.





यापूर्वी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी वक्फ विधेयकाबाबत न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने २ एप्रिल रोजी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या आणि कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. तर द्रमुक नेते स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले होते की, त्यांचा पक्ष या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल.



लोकसभेत विधेयक मंजूर झाल्याच्या निषेधार्थ स्टॅलिन काळी पट्टी घालून विधानसभेत पोहोचले. भारतातील मोठ्या संख्येने पक्षांच्या विरोधाला न जुमानता काही मित्रपक्षांच्या आदेशानुसार रात्री २ वाजता घटनादुरुस्ती स्वीकारणे हा संविधानाच्या रचनेवर हल्ला आहे. यापार्श्वभूमीवर सोशल मिडीयात केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस लवकरच वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ च्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांवर, तरतुदींवर आणि पद्धतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून होणाऱ्या सर्व हल्ल्यांना आम्ही विरोध करत राहू असे जयराम रमेश यांनी सांगितले.


काँग्रेसने यापूर्वी सीएएला कायद्याला आव्हान दिले असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच माहिती अधिकार कायद्यातील २०१९ च्या सुधारणांना काँग्रेसने आव्हान दिले आहे. निवडणूक आचार नियमातील (२०२४) सुधारणांच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे यावरही सुनावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे, १९९१ च्या (प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट) प्रार्थनास्थळ कायद्याची मूळ भावना राखण्यासाठी काँग्रेसने केलेल्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात एक खटला प्रलंबित आहे.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला