क्लीन अप मार्शल आजपासून दिसणार नाही रस्त्यावर

दिसल्यास कळवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत मुंबईत सार्वजनिक स्वच्छता देखरेखसाठी ‘क्लीन अप मार्शल’ उपक्रम अंतर्गत नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा शुक्रवार ४ एप्रिल २०२५ पासून खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे, शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ नंतर या ‘क्लीन अप मार्शल’ कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


‘क्लीन अप मार्शल’ कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिक मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाच्या ०२२ – २३८५५१२८ आणि ०२२ – २३८७७६९१ (विस्तारित क्रमांक ५४९/५००) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.


मुंबईकरांची स्वच्छतेच्या नावावर लूट करण्याचा परवानाच मिळाला आहे, या थाटात काही क्लीन अप मार्शल दंडाच्या भय दाखवून लूट करत होते. हे अभियान मुंबईत स्वच्छता राखणे आणि अस्वच्छता करणाऱ्यांना शिस्त लागावी, या हेतूने राबवण्यात आले होते. परंतु हा हेतू साध्य न होता विषय तेव्हा दंडाच्या नावाखाली मुंबईकरांची लूट करत आहेत, असे समोर आले होते. याबाबतच्या तक्रारी वारंवार येत असल्याने महापालिकेने ही सेवा कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवार ०३ एप्रिल ही शेवटची तारीख होती. त्यामुळे पासून ही सेवा यापुढे रस्त्यावर दिसणार नसून जर शुक्रवारपासून क्लीन मार्शल दिसले,मुंबईकरांनी त्यांना जाब विचारून याची माहिती महापालिकेने जारी केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई