१ मेपासून ‘एक राज्य, एक नोंदणी’

जमीन, मालमत्ता खरेदीची कोणत्याही निबंधक कार्यालयात होणार नोंदणी


मुंबई : आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग १ मे, महाराष्ट्र दिनापासून ‘एक राज्य, एक नोंदणी’ सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.



महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येत नव्हता. एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयामध्ये केली जात आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांचा वेळ आणि पैसे वाया जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ‘एक राज्य, एक नोंदणी’ हा उपक्रम सुरू करत आहे. १७ फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत हा उपक्रम लागू करण्यात आला होता. त्यानंतर १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांतही तो राबविण्यात आला. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४८ दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये दस्त नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यात सुरू केला जात आहे.



डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य


कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्यास, दस्तऐवजावर विभागाचा अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करील. सुरक्षिततेच्या उपायासाठी, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पडताळणीद्वारे ओळख अनिवार्य केली जाईल. तसेच, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीने दस्त सादर करणे अनिवार्य करण्यात येईल, अशी माहितीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Comments
Add Comment

Food Adulteration : फळे आणि भाज्यांमध्ये घातक रसायनांचा वापर करणारे रडारवर

- दोषींचे परवाने रद्द होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या

Maharashtra FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता

'Corporate Jihad' : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, २५ हून अधिक शिफारसी

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला

Maharashtra Rain Alert : ऐन उन्हाळ्यात 'या' दिवशी राज्यात जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र आहे. एकाबाजूला हैराण करून सोडणारा उकाडा तर दुसऱ्या बाजूला मुसळधार

Riteish and Genelia visit Kolhapur : 'राजा शिवाजी'च्या घवघवीत यशानंतर रितेश-जेनेलिया कोल्हापुरात; श्री अंबाबाईचे घेतले दर्शन!

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shhivaji Movie) या ऐतिहासिक चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

Minister Sanjay Shirsat : नाशिकमधील 'टीसीएस'प्रकरण म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचे रॅकेट, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

मुंबई : "नाशिकच्या 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद