बँकेत मनसैनिकांनी केला राडा, सदावर्ते - राज ठाकरे आमनेसामने

  129

मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात मराठीत बोललंच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांना आदेश दिला की, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे तपासा. कार्यकर्ते या आदेशानंतर लगेच सक्रीय झाले.



लोणावळ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेत बोलत नाही म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरला थोबाडीत मारली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता या घटनेवरुन वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे आमनेसामने असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत केलेल्या राड्यावरुन सदावर्ते यांनी मनसेवर कडाडून टीका केली. ज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांची टोळकी बँकांमध्ये धुडगूस घालत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. कायदा हाती घेणाऱ्या टोळक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.

राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप, शह काटशह हे आलेच. जो राजकारणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार त्याला त्याच्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावेच लागेल. पण राजकारणासाठी कायदा हाती घेणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीत राहून राजकारण करावे; असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
Comments
Add Comment

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या