IPL 2025: ७ सामने ४४४ धावा, ४ अर्धशतके आणि १ शतक...८.५ कोटींच्या साई सुदर्शनचा जलवा

मुंबई: आयपीएल २०२५च्या १४व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ विकेटनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला साई सुदर्शन आणि जोस बटलर. जोस बटलर नाबाद राहिला आणि त्याने ७३ धावांची खेळी केली. मात्र साई सुदर्शनने गुजरातसाठी मोमेंट सेट केले आणि ४९ धावांची खेळी केली. साई सुदर्शन सातत्याने आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे.



गेल्या ७ डावांवर नजर


साई सुदर्शनच्या गेल्या ७ डावांवर नजर टाकल्यास त्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होतो. एकदा तो अर्धशतक बनवण्यापासून चुकला तर एकदाच साईला १० पेक्षा कमी धावसंख्या करता आली. ७ डावांत साई सुदर्शनने ४४४ धावा केल्यात. म्हणजेच ८.५ कोटी किंमतींत त्याने आयपीएलमध्ये अशी कमाल केलीये जी महागडे क्रिकेटरही करू शकले नाहीत.



गेल्या ७ डावांतील खेळी


65(39)
84*(49)
6(14)
103(51)
74(41)
63(41)
49(36)



या हंगामात दुसऱ्या स्थानावर साई सुदर्शन


या हंगामात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर लखनऊचा निकोलस पूरन आहे. त्याने ३ सामन्यांत आतापर्यंत १८९ धावा केल्या आहेत. तर साई सुदर्शनने ३ सामन्यात १८६ धावा केल्यात.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.