भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या

मुंबई : मेट्रो ३ ही देशातील १०० टक्के व राज्यातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला संकूल (बीकेसी) असा दहा स्थानकांचा आणि १२.९९ किमी लांबीचा आहे. त्याचेच उद्द्घाटन पंतप्रधानांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले होते. या टप्प्यात सीप्झ, एमआयडीसी, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल यांचा समावेश आहे. तसे असतानाही मार्गिकेवर प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा नाममात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात सुरू झालेल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या असल्याचे चित्र आहे. अत्यल्प प्रवासी संख्येमुळे मयादित गाड्यांचाच वापर होत असल्याने उर्वरित गाडया तशाच उभ्या आहेत.



मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज दोन लाख प्रवाशांची ये-जा असेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सध्या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या जेमतेम २० हजारांच्या घरात आहे. त्यामुळेच सर्व गाड्यांचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. पहिल्या टप्प्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण नऊ गाड्यांपैकी अवघ्या तीन गाड्या वापरात आहेत. त्यातही दोनच गाड्या दररोज प्रत्यक्ष सेवेत आहेत.


तिसरी गाडी' स्टँडबाय' असते. मात्र परिणामी सहा गाड्या आरे येथील कारशेडमध्ये तशाच धूळखात उभ्या असल्याचे आरे जेव्हीएलआर स्थानकावार गेल्यानंतर स्पष्ट दिसून येत आहे. ही मार्गिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) या संयुक्त कंपनीकडून चालवली जाते. नेमक्या किती गाड्या दररोज चालवल्या जातात, याबाबत विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

Yashwantrao Chavan Expressway : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

Mumbai Clean League : स्वच्छतेच्या निकषांवर आता सर्व सहायक आयुक्तांच्या कामांचे मूल्यमापन

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश मुंबई : मुंबई क्लीन लीगमध्ये रहिवासी संकूल, वाणिज्य संकुलांचा

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर