भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या

मुंबई : मेट्रो ३ ही देशातील १०० टक्के व राज्यातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला संकूल (बीकेसी) असा दहा स्थानकांचा आणि १२.९९ किमी लांबीचा आहे. त्याचेच उद्द्घाटन पंतप्रधानांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले होते. या टप्प्यात सीप्झ, एमआयडीसी, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल यांचा समावेश आहे. तसे असतानाही मार्गिकेवर प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा नाममात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात सुरू झालेल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या असल्याचे चित्र आहे. अत्यल्प प्रवासी संख्येमुळे मयादित गाड्यांचाच वापर होत असल्याने उर्वरित गाडया तशाच उभ्या आहेत.



मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज दोन लाख प्रवाशांची ये-जा असेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सध्या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या जेमतेम २० हजारांच्या घरात आहे. त्यामुळेच सर्व गाड्यांचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. पहिल्या टप्प्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण नऊ गाड्यांपैकी अवघ्या तीन गाड्या वापरात आहेत. त्यातही दोनच गाड्या दररोज प्रत्यक्ष सेवेत आहेत.


तिसरी गाडी' स्टँडबाय' असते. मात्र परिणामी सहा गाड्या आरे येथील कारशेडमध्ये तशाच धूळखात उभ्या असल्याचे आरे जेव्हीएलआर स्थानकावार गेल्यानंतर स्पष्ट दिसून येत आहे. ही मार्गिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) या संयुक्त कंपनीकडून चालवली जाते. नेमक्या किती गाड्या दररोज चालवल्या जातात, याबाबत विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या