काका फक्त आशीर्वादापुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीसांनी काढला शरद पवारांना चिमटा

  127

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत, शरद पवारांना (Sharad Pawar) चिमटा काढला.


अजित पवारांनी "काकांच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलं चाललंय," असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा, अजित पवारांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतेच मर्यादित ठेवलं आहे!" या शब्दांत त्यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.



याशिवाय, वक्फ सुधारणा विधेयकावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. "हे विधेयक संसदेत मांडण्यात आले असून ते निश्चितपणे पास होणार. तसेच वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. हे विधेयक समाज किंवा धर्माच्या आस्थांविरोधात नाही. सद्सद् विवेकबुद्धी असणारे लोक त्याला पाठिंबा देतील. मात्र, विरोधक फक्त मतांच्या तुष्टीकरणासाठी त्याला विरोध करत आहेत," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही