मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत, शरद पवारांना (Sharad Pawar) चिमटा काढला.
अजित पवारांनी “काकांच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलं चाललंय,” असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा, अजित पवारांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतेच मर्यादित ठेवलं आहे!” या शब्दांत त्यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
याशिवाय, वक्फ सुधारणा विधेयकावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “हे विधेयक संसदेत मांडण्यात आले असून ते निश्चितपणे पास होणार. तसेच वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. हे विधेयक समाज किंवा धर्माच्या आस्थांविरोधात नाही. सद्सद् विवेकबुद्धी असणारे लोक त्याला पाठिंबा देतील. मात्र, विरोधक फक्त मतांच्या तुष्टीकरणासाठी त्याला विरोध करत आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग…