विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ मध्ये नो एंट्री

७ एप्रिलपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा एमएमआरसीचा निर्णय


मुंबई : ‘कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३’मार्गिकेतील आरे–बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ७ एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार असून ८ एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.



एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत. देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार मंगळवार, १ एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.


एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार १ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी १’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, आरे–बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे वा सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही