Comedian Kunal Kamra : कुणाल कामराचा कारनामा थांबेना! पोस्ट मधून पुन्हा सरकारला डिवचलं

  67

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कुणाल कामरा विषय जोर धरू लागला आहे. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह कविता रचल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कामराच्या कवितेनंतर शिवसैनिकांनी संतापून त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली त्यानंतर त्याने केलेल्या कवितेचे पडसाद अधिवेशनावर सुद्धा पडले होते. त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून कुणाल कामरा फरार होता. त्यानंतर त्याला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले. पोलिसांनी तिसऱ्या समन्सद्वारे कुणाल कामराला ५ एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण कुणाल कामरा चौकशीला अनुपस्थित राहिला होता. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादानंतरही तो सोशल मीडियावर विविध वादग्रस्त पोस्ट आणि स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत आहे. आता कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे.



काय आहे कुणाल कामराची पोस्ट ??


‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन १- आक्रोश- त्यांच्या कामासाठी ब्रँड्सने जाहिराती मिळवून देणं बंद करण्यासाठी पुरेसं आहे. २- अधिक आक्रोश करा- खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम संपेपर्यंत ३- आणखी मोठा आक्रोश करा- जेणेकरून मोठमोठी ठिकाणं जोखीम घेणार नाहीत. ४- हिंसक आक्रोश करत रहा- जोपर्यंत सर्वांत लहान ठिकाणंदेखील कार्यक्रमांसाठी त्यांचे दरवाचे बंद करत नाहीत. ५- त्यांच्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवा- कलेचं ठिकाण गुन्हेगारीच्या ठिकाणात बदला.





आता कलाकाराकडे फक्त दोनच पर्याय उरतात: एकतर त्यांचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बनणं किंवा मौन बाळगून कोमेजणं हे फक्त प्लेबुक नाही, हे एक राजकीय शस्त्र आहे, गप्प बसवण्याचं एक यंत्र आहे,’ असं त्याने लिहिलंय. दरम्यान आता कुणाल कामराच्या या पोस्टनंतर मुंबई पोलीस कोणतं नवीन पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.