Comedian Kunal Kamra : कुणाल कामराचा कारनामा थांबेना! पोस्ट मधून पुन्हा सरकारला डिवचलं

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कुणाल कामरा विषय जोर धरू लागला आहे. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह कविता रचल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कामराच्या कवितेनंतर शिवसैनिकांनी संतापून त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली त्यानंतर त्याने केलेल्या कवितेचे पडसाद अधिवेशनावर सुद्धा पडले होते. त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून कुणाल कामरा फरार होता. त्यानंतर त्याला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले. पोलिसांनी तिसऱ्या समन्सद्वारे कुणाल कामराला ५ एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण कुणाल कामरा चौकशीला अनुपस्थित राहिला होता. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादानंतरही तो सोशल मीडियावर विविध वादग्रस्त पोस्ट आणि स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत आहे. आता कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे.



काय आहे कुणाल कामराची पोस्ट ??


‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन १- आक्रोश- त्यांच्या कामासाठी ब्रँड्सने जाहिराती मिळवून देणं बंद करण्यासाठी पुरेसं आहे. २- अधिक आक्रोश करा- खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम संपेपर्यंत ३- आणखी मोठा आक्रोश करा- जेणेकरून मोठमोठी ठिकाणं जोखीम घेणार नाहीत. ४- हिंसक आक्रोश करत रहा- जोपर्यंत सर्वांत लहान ठिकाणंदेखील कार्यक्रमांसाठी त्यांचे दरवाचे बंद करत नाहीत. ५- त्यांच्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवा- कलेचं ठिकाण गुन्हेगारीच्या ठिकाणात बदला.





आता कलाकाराकडे फक्त दोनच पर्याय उरतात: एकतर त्यांचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बनणं किंवा मौन बाळगून कोमेजणं हे फक्त प्लेबुक नाही, हे एक राजकीय शस्त्र आहे, गप्प बसवण्याचं एक यंत्र आहे,’ असं त्याने लिहिलंय. दरम्यान आता कुणाल कामराच्या या पोस्टनंतर मुंबई पोलीस कोणतं नवीन पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत