IPL 2025: जोस बटलर आणि साई सुदर्शनच्या झंझावातासमोर बंगळुरूची शरणागती, गुजरातने ८ विकेट राखत जिंकला सामना

बंगळुरू: आयपीएल २०२५मध्ये आज घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना गुजरात टायटन्स संघाने ८ विकेट राखत हरवले. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १६९ धावा केल्या होत्या. मात्र गुजरात टायटन्सने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.


१७० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. गिल आणि साई सुदर्शन यांनी ठोस सुरूवात करून दिली. दरम्यान, गिल १४ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी मोर्चा सांभाळला. साई सुदर्शन ४९ धावा करून बाद झाला. यानंतर बटलरने शानदार गोलंदाजी केली. त्याने नाबाद ७३ धावा ठोकल्या. यासोबतच १८व्या षटकांतच त्यांनी हा सामना जिंकला.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीला विराट कोहलीच्या रूपात पहिला झटका बसला. कोहली केवळ ७ धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्याच षटकांत देवदत्त पड्डिकलला सिराजने बोल्ड केले. ५व्या षटकांत फिल सॉल्टलाही सिराजने बाद केले. ७व्या षटकांत कर्णधार रजत पाटीदारला इशांतने बाद केले.


यानंतर जितेश शर्माने मोर्चा सांभाळला. त्याने ३३ धावांची खेळी केली. मात्र तो १३व्या षटकांत बाद झाला. मात्र यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकले. तर टीम डेविडनेही शानदार फलंदाजी केली. याच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ८ बाद १७० धावा केल्या.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.