INS Tarkash : हिंद महासागरात नौदलाची धडक कारवाई, २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने ३१ मार्च २०२५ रोजी हिंद महासागरात धडक कारवाई केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली.



हिंद महासागरात संशयास्पद हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीआधारे आयएनएस तर्कश या युद्धनौकेने एका जहाजाला अडवून तपासणी केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी संशयास्पद जहाजाची तपासणी केली. तपासणी करुन २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे.

भारतीय नौदलाने माहिती मिळताच P8I या समुद्रात दूरवर गस्त घालू शकणाऱ्या विमानाद्वारे हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका जहाजाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या जहाजावर हेलिकॉप्टरद्वारे नौदलाचे कमांडो पथक पाठवण्यात आले. या पथकाने हेलिकॉप्टरमधून रश्शी टाकून थेट संशयास्पद जहाजावर वेगाने उतरत कारवाई केली. तपासणी केल्यावर जहाजावर २५०० किलो अमली पदार्थ सापडले. हवाबंद पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवले होते. या संदर्भात चौकशी केल्यावर जहाजावर कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यानंतर वेगाने कारवाई करुन जप्ती करण्यात आली. तसेच जहाज नौदलाच्या नियंत्रणात ठेवून जवळच्या बंदरावर आणण्यात आले. जप्त केलेल्या मालात २३८६ किलो हशीश आणि १२१ किलो हेरॉईन आहे. हिंद महासागराच्या पश्चिमेकडील भागात कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर