नवी दिल्ली : भारतीय नौदलाने ३१ मार्च २०२५ रोजी हिंद महासागरात धडक कारवाई केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली.
हिंद महासागरात संशयास्पद हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीआधारे आयएनएस तर्कश या युद्धनौकेने एका जहाजाला अडवून तपासणी केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी संशयास्पद जहाजाची तपासणी केली. तपासणी करुन २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे.
भारतीय नौदलाने माहिती मिळताच P8I या समुद्रात दूरवर गस्त घालू शकणाऱ्या विमानाद्वारे हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका जहाजाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या जहाजावर हेलिकॉप्टरद्वारे नौदलाचे कमांडो पथक पाठवण्यात आले. या पथकाने हेलिकॉप्टरमधून रश्शी टाकून थेट संशयास्पद जहाजावर वेगाने उतरत कारवाई केली. तपासणी केल्यावर जहाजावर २५०० किलो अमली पदार्थ सापडले. हवाबंद पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवले होते. या संदर्भात चौकशी केल्यावर जहाजावर कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यानंतर वेगाने कारवाई करुन जप्ती करण्यात आली. तसेच जहाज नौदलाच्या नियंत्रणात ठेवून जवळच्या बंदरावर आणण्यात आले. जप्त केलेल्या मालात २३८६ किलो हशीश आणि १२१ किलो हेरॉईन आहे. हिंद महासागराच्या पश्चिमेकडील भागात कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…