INS Tarkash : हिंद महासागरात नौदलाची धडक कारवाई, २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने ३१ मार्च २०२५ रोजी हिंद महासागरात धडक कारवाई केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली.



हिंद महासागरात संशयास्पद हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीआधारे आयएनएस तर्कश या युद्धनौकेने एका जहाजाला अडवून तपासणी केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी संशयास्पद जहाजाची तपासणी केली. तपासणी करुन २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे.

भारतीय नौदलाने माहिती मिळताच P8I या समुद्रात दूरवर गस्त घालू शकणाऱ्या विमानाद्वारे हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका जहाजाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या जहाजावर हेलिकॉप्टरद्वारे नौदलाचे कमांडो पथक पाठवण्यात आले. या पथकाने हेलिकॉप्टरमधून रश्शी टाकून थेट संशयास्पद जहाजावर वेगाने उतरत कारवाई केली. तपासणी केल्यावर जहाजावर २५०० किलो अमली पदार्थ सापडले. हवाबंद पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवले होते. या संदर्भात चौकशी केल्यावर जहाजावर कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यानंतर वेगाने कारवाई करुन जप्ती करण्यात आली. तसेच जहाज नौदलाच्या नियंत्रणात ठेवून जवळच्या बंदरावर आणण्यात आले. जप्त केलेल्या मालात २३८६ किलो हशीश आणि १२१ किलो हेरॉईन आहे. हिंद महासागराच्या पश्चिमेकडील भागात कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही