दिवा आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; अनधिकृत टँकर भरणा केंद्रही केले बंद

ठाणे महापालिकेची कारवाई


ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी दिवा-आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. तसेच, याच भागात सुरू असलेले अनधिकृत टॅंकर भरणा केंद्रही तत्काळ बंद करण्यात आले. ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.



महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅंकर भरणा केंद्राचा पंप,पाईपलाईन जप्त करण्यात आली. तसेच,अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.


टाक्या, मोटर पंप जप्त करण्यात आले.ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी,उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे,उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके, प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई केली.

Comments
Add Comment

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत