Train Accident: झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर

  97

नवी दिल्ली: झारखंडच्या बरहेटमध्ये दोन मालगाड्यांची आपापसात टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चार जण जखमी झालेत.


खरंतर, फरक्का येथून ललमटिया येथे जात असलेली मालगाडी बरहेटमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनांच्या चिंधड्या उडाल्या आणि आग लागली. या मालगाड्या कोळसा घेऊन जात होत्या.


घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची गाडी तेथे पोहोचली. दोन्ही लोको पायलटचा या दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, जे चार जण यात जखमी झाले ते सर्व रेल्वेचे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच या अपघातामागचे कारण शोधले जात आहे .


 


मार्ग सुरळीत करण्यासाठी लागतील ३ दिवस


ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातानंतर मालगाडीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच हा मार्ग बंद झाला आहे. याला सुरळीत करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागू शकतो.


दरम्यान, रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे विभाग या अपघाताचा तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही मालगाड्या एकाच रेल्वे रूळावर आल्या कशा याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये