Train Accident: झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर

Share

नवी दिल्ली: झारखंडच्या बरहेटमध्ये दोन मालगाड्यांची आपापसात टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चार जण जखमी झालेत.

खरंतर, फरक्का येथून ललमटिया येथे जात असलेली मालगाडी बरहेटमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनांच्या चिंधड्या उडाल्या आणि आग लागली. या मालगाड्या कोळसा घेऊन जात होत्या.

घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची गाडी तेथे पोहोचली. दोन्ही लोको पायलटचा या दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, जे चार जण यात जखमी झाले ते सर्व रेल्वेचे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच या अपघातामागचे कारण शोधले जात आहे .

 

मार्ग सुरळीत करण्यासाठी लागतील ३ दिवस

ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातानंतर मालगाडीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच हा मार्ग बंद झाला आहे. याला सुरळीत करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे विभाग या अपघाताचा तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही मालगाड्या एकाच रेल्वे रूळावर आल्या कशा याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

10 minutes ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

22 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

25 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

25 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

33 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

44 minutes ago