Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

पहा राज्यात कसं असेल तापमान?


मुंबई : चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची (Weather Update) वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.



शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले (Meteorological Department) आहे.



ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट 


आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. (Mumbai Weather)



आज नाशकात ऑरेंज अलर्ट 


मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Nashik Weather)



पुण्यातही पावसाची शक्यता (Pune Weather)


पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.


दरम्यान, बदलत्या हवामानमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Wardha Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारला आग लागून पाच जणांचा मृत्यू, एक गंभीर

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) रविवारी उशिरा रात्री भीषण अपघात (Accident) घडला. या दुर्घटनेत

Landslide : हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील

Eknath Shinde : पंढरपूर कॉरिडॉरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; "शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही"

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी सरकारची जय्यत तयारी! पंढरपूरच्या विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्सपासून CCTV पर्यंत सर्व सुविधा सज्ज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीत भाविकांना दिलासा; मंदिर समितीकडून अन्नदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन

Eknath Shinde :भरपावसात उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर : आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भरपावसात पंढरपूर येथे