अयोध्येतील राम मंदिरात रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी

दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना मिळणार प्रसाद


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे आकर्षण यच्किंचितही कमी झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे लोकार्पण करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटत आहे. अयोध्येतील राम मंदिरात आता दुसऱ्यांदा श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, असा कयास असून, राम मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.


अलीकडेच झालेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. अभूतपूर्व गर्दी अयोध्येत लोटली. यातच आता चैत्र महिन्यातील राम नवरात्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवरही अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. यातच आता रामललाचे दर्शन घेतल्यावर भाविकांना राम मंदिरातच प्रसाद देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.



श्रीराम नवमीच्या निमित्ताने अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन, पूजनासोबतच राम मंदिरातून बाहेर पडताना श्रीरामांचा प्रसाद दिला जाणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर ट्रस्टने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता भाविक राम मंदिरातून परततील, तेव्हा त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गावर भगवान रामाचा प्रसाद दिला जाईल. अंगद टीला येथे राम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बाहेर पडण्याच्या मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.



सीता रसोईची सेवा उपलब्ध


राम मंदिर ट्रस्ट सीता रसोई चालवत आहे. सीता रसोईत तयार झालेला प्रसाद पहिल्या दिवशी ७० हजारांहून अधिक रामभक्तांनी घेतला, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या ५० हजारांच्या वर पोहोचली. राम मंदिर ट्रस्ट संचालित सीता रसोईच्या प्रभारींनी सांगितले की, राम मंदिर ट्रस्टकडून बाहेर पडण्याच्या मार्गावर सीता रसोई चालवली जात आहे. येथे, रामभक्त मोठ्या उत्साहाने रामललाला अर्पण केलेला नैवेद्य हा प्रसाद स्वरुपात घेत आहेत. अयोध्येत पोहोचलेले भाविक मंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर भावूक होत आहेत आणि राम मंदिर ट्रस्टचे कौतुकही करत आहेत.

Comments
Add Comment

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान