Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात 'पाणीबाणी'

कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.




मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारपासून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा सेंट्रल रेल्वेला पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

Comments
Add Comment

Gold Buying Tips : सोनं खरेदी करताना 'या' 7 चुका टाळा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. सणासुदीच्या

Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

पाण्यात कोणता पदार्थ मिसळावा आणि हे पाणी प्यायल्याने काय फायदा होईल जाणून घ्या. तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरचे

Kalashtami 2026 : आज मासिक कालाष्टमी; भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

भगवान शिवाचे उग्र स्वरूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मासिक

Nashik Crime : 'डायल 112' वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी 'डायल 112' ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून

Jalgaon Accident : टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या

Forever Young Look : नेहमी चिरतरुण दिसायचंय? मग घरच्याघरी करा हे सोपे उपाय; त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी

मुंबई : वाढते वय थांबवता येत नसले, तरी योग्य जीवनशैली आणि त्वचेची नियमित काळजी घेतल्यास दीर्घकाळ चिरतरुण आणि