Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात 'पाणीबाणी'

कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.




मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारपासून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा सेंट्रल रेल्वेला पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

Comments
Add Comment

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला