Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात 'पाणीबाणी'

कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.




मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारपासून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा सेंट्रल रेल्वेला पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

Anil Ambani ED Case | अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे