Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात 'पाणीबाणी'

कल्याण : घरी पाणी नसेल तर गृहिणींची दिवसभराची चिंता वाढते. मात्र रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा खंडित झालेलं तुम्ही ऐकलय का? अशीच बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानकात पाणीबाणी सुरु होती. पाणी बिल थकल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. या पाणीबाणीमुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.




मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारपासून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचे तब्बल ४.४ कोटी रुपये पाणी बिल थकले होते. त्यामुळे महापालिकाने शनिवार संध्याकाळपासून पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे स्टेशनवरील प्रवाशांना खूप त्रास झाला. स्टेशनवर काम करणारे कर्मचारी, रेल्वे हॉस्पिटलमधील लोक, जीआरपी आणि आरपीएफ जवानांना पाण्यासाठी खूप गैरसोय झाली. महापालिकाने यापूर्वीही अनेक नोटिसा सेंट्रल रेल्वेला पाठवल्या होत्या. महापालिकाने २८ मार्च रोजी सेंट्रल रेल्वेला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी २४ तासांच्या आत पाणी बिल भरण्यास सांगितले होते. बिलामध्ये यावर्षीचे १.०४ कोटी रुपये आणि लेट फीचे ३१ लाख रुपये होते. असे पत्रात नमूद केले. शनिवारी संध्याकाळी बंद झालेला पाणीपुरवठा रविवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी १.१७ कोटी रुपयांच्या चालू बिलाची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.

Comments
Add Comment

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला