Ration Card E-KYC : मोफत धान्यासाठी लवकर करा 'हे' काम अन्यथा रेशन कार्ड होईल आजच बंद!

  108

मुंबई : रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळ असलेल्या रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात. मात्र आता काही रेशनधारकांची केवायसी न झाल्यामुळे रेशनकार्ड बंद होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोट्यवधी नागरिक केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारकडून ही मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.




KYC कसे कराल ?


तुमच्या जवळ असलेल्या रेशनच्या दुकानावर जाऊन ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. ही केवायसी बायोमेट्रिक पद्धतीची असणारा आहे. बायोमेट्रिक पद्धतीची केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्ड आजच बंद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील