Ration Card E-KYC : मोफत धान्यासाठी लवकर करा 'हे' काम अन्यथा रेशन कार्ड होईल आजच बंद!

मुंबई : रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळ असलेल्या रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात. मात्र आता काही रेशनधारकांची केवायसी न झाल्यामुळे रेशनकार्ड बंद होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोट्यवधी नागरिक केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारकडून ही मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.




KYC कसे कराल ?


तुमच्या जवळ असलेल्या रेशनच्या दुकानावर जाऊन ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. ही केवायसी बायोमेट्रिक पद्धतीची असणारा आहे. बायोमेट्रिक पद्धतीची केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्ड आजच बंद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा

मुंबईतील पूर्व उपनगरातील ८ नाल्यांवर ट्रॅश बूम

उर्वरीत ८ नाल्यांवर सीएसआर निधीतून बसवणार ही प्रणाली मुंबई : उपनगरामधील विविध नाल्यांतील तरंगता कचरा जमा करणे,

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि