येत्या तीन दिवसात महाराष्ट्रासह ३ ते ४ राज्यांत पावसाची शक्यता

  104

मुंबई : उत्तर भारतात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस तापमानात पाच ते सात अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही राज्यांत उन्हाच्या कडाक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांमधील वातावरण बदलणार आहे. यातील केरळ आणि कर्नाटकात २ आणि ३ एप्रिलला मुसळधार पाऊस कोसळेल, असाही अंदाज आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये १ ते ३ एप्रिल, महाराष्ट्रातील विदर्भात १ एप्रिल, पूर्व मध्य प्रदेशात २ आणि ३ एप्रिल, उर्वरित महाराष्ट्र, गुजरातमध्ये ३१ मार्च ते ३ एप्रिल, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात १ ते ३ एप्रिल या कालावधीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. जोरदार वाऱ्यासह वादळी तडाख्याचीही शक्यता आहे. या राज्यांमध्ये वातावरणात अचानक बदल होणार असून, काही ठिकाणी ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

गेल्या २४ तासांत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाममध्ये जोरदार वारे वाहत होते. पश्चिम बंगालच्या काही भागांत उष्णतेच्या लाटांनी तडाखा दिला.अरुणाचल प्रदेशात ३० आणि ३१ मार्च, त्रिपुरात ३१ मार्च या कालावधीत जोरदार वारे वाहतील. तर पाऊस आणि वादळी वाऱ्याचाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम हिमालयाचा भाग, मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतात वातावरणात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज आहे. बिहार राज्यातील काही भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालसह, सौराष्ट्र, कच्छ आदी भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून ३१ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आसाममध्ये ३० मार्चपासून १ एप्रिल, त्रिपुरामध्ये ३० मार्चपासून ३ एप्रिल, तामिळनाडू, पद्दूचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यनम, केरळ आदी ठिकाणी ३० आणि ३१ मार्च या कालावधीत पारा वाढणार असून, आर्द्रताही वाढणार आहे.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची