IPL 2025: मुंबईच्या गोलंदाजांचा कहर, केकेआरची स्थिती दयनीय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. सामन्यात केकेआरने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, मुंबईच्या गोलंदाजांपुढे केकेआरच्या फलंदाजांनी मात्र गुडघे टेकले. कोलकाताने मुंबईला विजयासाठी ११७ धावांचे आव्हान दिले ाहे.


मुंबईकडून पदार्पण केलेला गोलंदाज अश्विनी कुमारने या सामन्यात ४ विकेट घेत केकेआरला जबरदस्त धक्का दिला. कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये ४ विकेट गमावले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दीपक चाहरने विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


यानंतर अश्विनी कुमारने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर कर्णधार अजिंक्य रहाणेला कॅच आऊट केले. तर दीपक चाहरने वेंकटेश अय्यरला बाद केले. वेंकटेश बाद झाल्यानंतर केकेआरची धावसंख्या ४ बाद ४१ इतकी होती.

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या