IPL 2025: मुंबईच्या गोलंदाजांचा कहर, केकेआरची स्थिती दयनीय

  141

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. सामन्यात केकेआरने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, मुंबईच्या गोलंदाजांपुढे केकेआरच्या फलंदाजांनी मात्र गुडघे टेकले. कोलकाताने मुंबईला विजयासाठी ११७ धावांचे आव्हान दिले ाहे.


मुंबईकडून पदार्पण केलेला गोलंदाज अश्विनी कुमारने या सामन्यात ४ विकेट घेत केकेआरला जबरदस्त धक्का दिला. कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये ४ विकेट गमावले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दीपक चाहरने विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


यानंतर अश्विनी कुमारने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर कर्णधार अजिंक्य रहाणेला कॅच आऊट केले. तर दीपक चाहरने वेंकटेश अय्यरला बाद केले. वेंकटेश बाद झाल्यानंतर केकेआरची धावसंख्या ४ बाद ४१ इतकी होती.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये