Ulhasnagar Metro : आता उल्हासनगरमध्ये धावणार मेट्रो! खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रो-५ चा विस्तार

मुंबई : उल्हासनगरला राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही. रस्तेमार्गे मुंबईत येणे खूप वेळखाऊ तर आहेच पण त्याचबरोबर पैसेदेखील अधिक मोजावे लागतात. मात्र आला लवकरच उल्हासनगरच्या नागरिकांचा (Ulhasnagar Metro) प्रवास सोप्पा होणार आहे. कारण लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली आहे.



ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ (Metro 5) मार्गिकेचा विस्तार आता कल्याण ऐवजी उल्हासनगर पर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगर पर्यंत मेट्रो जाणार आहे.


लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प मार्ग ५ ठाणे - भिवंडी कल्याणसाठी १,५७९.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उल्हासनगर, विरार, बदलापूर हा परिसरही मेट्रोने जोडला जाणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करत एमएमआरडीएने एमएमआरच्या भविष्याचा आराखडा मांडला असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ.संजय मुखर्जी यांनी दिली.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि