Mumbai Accident : मुंबईत दोन कारची समोरासमोर टक्कर, दोघांचा मृत्यू

मुंबई : दादरच्या सेनापती बापट मार्गावर दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक टॅक्सी चालक आणि एक महिला यांचा समावेश आहे.



हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवार २९ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर अपघात झाला. एका भरधाव एसयूव्ही कारने समोरुन टॅक्सीला धडक दिली. अपघातात टॅक्सीचा चुराडा झाला. टॅक्सी चालक आणि प्रवासी महिला यांचा मृत्यू झाला.



लोअर परळच्या एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. तसेच या परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. यामुळे या ठिकाणच्या वाहनांची संख्या खूप जास्त आहे. लाखो कर्मचारी या पुलाचा वापर करत असतात. पण आज शनिवार असल्याने नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती. वाहने नेहमीच्या तुलनेत वेगाने जात होती. याचवेळी अपघात झाला. मोकळ्या रस्त्यावरुन वेगाने आलेल्या कार आणि टॅक्सीची धडक झाली.

कोकणात तीन अपघात

कोकणात तीन ठिकाणी अपघात झाले. एकाचा मृत्यू झाला आणि ३५ जण जखमी झाले. अलिबाग बायपास जवळ असेलल्या चर्चेजवळ मोटारसायकल आणि स्कुटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे भागातील हॉटेल विरंगुळा येथे भरधाव कारची दुचाकीला धडक बसली. गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुचाकीला धडक देत मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पीक अप गाडीवर आदळली. अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. यात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील 35 प्रवासी जखमी झाले. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments
Add Comment

हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल

मुंबई : हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार

मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत

'पल्स' मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

मुंबई : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे

द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी तासगाव व नाशिक येथे विशेष केंद्रांच्या मागणीचा सकारात्मक

मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात

बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू

पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर मिळणार न्याय

मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना