Balochistan : बलुचिस्तानमध्ये आयईडी स्फोट; आठ पाकिस्तानी सैनिक ठार आणि चार जखमी

ग्वादर : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरात शुक्रवार २८ मार्च २०२५ रोजी रमझान महिन्यातील अलविदा जुमाच्या दिवशी आयईडी स्फोट झाला. या स्फोटात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले आणि चार सैनिक जखमी झाले. अज्ञात हल्लेखोरांना पदीजर भागात मरिन ड्राईव्हवर असलेल्या जीपीए कार्यालयाच्या जवळ एका लष्करी वाहनाला लक्ष्य करुन आयईडीचा स्फोट केला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेच हा हल्ला केल्याची शक्यता पाकिस्तानच्या लष्कराकडून व्यक्त करण्यात आली आहे.



याआधी बुधवार २६ मार्च २०२५ रोजी ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा राजमार्गावर एका बसमध्ये बसलेल्या सहा जणांना रस्त्यात उतरवून ठार करण्यात आले. ठार मारलेले सर्व प्रवासी पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे रहिवासी होते. हल्लेखोरांनी ओळखपत्र तपासून नंतर प्रवाशांना ठार केले.



पाकिस्तानच्या सैनिकांनी २२ मार्च रोजी मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या महरंग बलोच यांना अटक केली. या घटनेनंतर बलुचिस्तान प्रांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही