Amravati News : आठवडाभरात पारा ४० अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका

अमरावती : गेल्या आठ दिवसांपासून तापमान ३९अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम फळबागा व भाजीपाल्यावर होत आहे. उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला व लिंबू महाग होणार आहेत. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे.


अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे आजारपणात वाढ झाली होती. सध्या व्हायरल कमी झाले असले तरी पिकांवर संकट येऊ घातले आहे. गहू काढण्यात आला असला तरी कांदा अजून बाकी आहे. फळबागा व भाजीपाला सध्या लागवड केलेले आहेत. यात प्रामुख्याने वांग्याचा समावेश आहे. लग्न सराईचे दिवस येत असल्याने वांग्याची मागणी अधिक असते. मात्र या वांग्यावर उष्णतेचा परिणाम होत असून चवही लागत नाही.



ऊन्हाचा भाज्यांना फटका बसत आहे. उन्हाळ्यातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्रता पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रीतीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा.


सध्याच्या वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करताना ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे. मनीषकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भुजल पातळीत घट तापमान वाढत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे पिकांना, भाजीपाला पिकांना, फळबागांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.