Amravati News : आठवडाभरात पारा ४० अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका

अमरावती : गेल्या आठ दिवसांपासून तापमान ३९अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम फळबागा व भाजीपाल्यावर होत आहे. उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला व लिंबू महाग होणार आहेत. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे.


अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे आजारपणात वाढ झाली होती. सध्या व्हायरल कमी झाले असले तरी पिकांवर संकट येऊ घातले आहे. गहू काढण्यात आला असला तरी कांदा अजून बाकी आहे. फळबागा व भाजीपाला सध्या लागवड केलेले आहेत. यात प्रामुख्याने वांग्याचा समावेश आहे. लग्न सराईचे दिवस येत असल्याने वांग्याची मागणी अधिक असते. मात्र या वांग्यावर उष्णतेचा परिणाम होत असून चवही लागत नाही.



ऊन्हाचा भाज्यांना फटका बसत आहे. उन्हाळ्यातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्रता पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रीतीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा.


सध्याच्या वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करताना ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे. मनीषकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भुजल पातळीत घट तापमान वाढत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे पिकांना, भाजीपाला पिकांना, फळबागांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.