बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल ?

  32

मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड भारताच्या पुरूष क्रिकेट संघासाठी लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करणार आहे. यासाठी आयपीएल २०२५ च्या दरम्यान येत्या २९ मार्चला मिटिंगही घेण्यात येणार आहे.या दरम्यान सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबरोबरच अनेक निर्णयही घेतले जाणार आहेत. पण यापूर्वी रोहित-विराट-जडेजा यांच्याबद्दल एक अपडेट देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,निवडकर्ते केंद्रीय करारामध्ये अनेक बदल करू शकतात. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची गुवाहाटी येथे २९ मार्च रोजी बैठक होणार असून जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या संभाव्य संघावर चर्चा होणार आहे. या बैठकीत पुरूष संघाच्या केंद्रीय करारालाही अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्याआधीच कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचं डिमोशन होऊ शकतं असं म्हटलं आहे. याशिवाय, पहिल्यांदाच काही नवीन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

भारतातील काही दिग्गज स्टार्सच्या भविष्यावर निवड समिती चर्चा करणार आहे. त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासाठी संकेत देण्यात आले होते. रोहित, कोहली आणि जडेजा सध्या A+ श्रेणीत आहेत, जे केंद्रीय करारांमध्ये अव्वल आहे. ही श्रेणी सर्वसाधारणपणे सर्व फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी राखीव आहे. पण रोहित, कोहली आणि जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना A+ श्रेणीतून A श्रेणीत ठेवले जाईल. रोहित शर्माची कर्णधारपदासाठी निवड करण्याबाबत कोणतेही एकमत झालेले नाही. रोहितची वनडेमधील कामगिरी पाहता बीसीसीआय काय निर्णय घेणार यावर सर्वांचं लक्ष असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त जसप्रीत बुमराह A+ श्रेणीत कायम राहू शकतो. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल (A श्रेणी) याला सर्वोच्च श्रेणीत बढती मिळू शकते. तर यशस्वी जैस्वाल (ब श्रेणी) अ श्रेणीत जाऊ शकतो. आणखी एक खेळाडू ज्याला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती मिळू शकते तो म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल आहे. तर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर झालेल्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना पुन्हा संधी मिळेल.नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अभिषेक शर्मा यांचा प्रथमच केंद्रीय करारात समावेश केला जाऊ शकतो, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी C श्रेणीमध्ये स्थान दिले जाऊ शकते, ज्यासाठी क्रिकेटपटूने किमान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र