Railway Megablock Update : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता रविवारी नाही तर 'या' दिवशी असणारा मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : रविवार म्हटलं कि सुट्टीच्या दिवशी फिरणं होत. पण मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडतात. गाड्या उशिराने असतील तर प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता शनिवारीसुद्धा घेण्यात येणाऱ्या पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.



मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २९ ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी (दि २९) रात्री उशिरा १:३० वाजल्यापासून रविवारी (३० मार्च) पहाटे ४ : ३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. दरम्यानच्या काळात अंबरनाथ ते बदलापूरमधील रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. ब्लॉक काळात अंबरनाथ ते कर्जतदरम्यान कोणतीही लोकलसेवा सुरू राहणार नाही, तर काही रेल्वेसेवा कमी- जास्त प्रमाणात रद्द केल्या जातील. लोकल सेवांमध्ये शनिवारी रात्री ११ :१३ मिनिटांनी निघणारी परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत जाणार असून ११:५१ वाजता निघणारी सीएसएमटी- बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे.


मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी