Railway Megablock Update : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता रविवारी नाही तर 'या' दिवशी असणारा मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : रविवार म्हटलं कि सुट्टीच्या दिवशी फिरणं होत. पण मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडतात. गाड्या उशिराने असतील तर प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता शनिवारीसुद्धा घेण्यात येणाऱ्या पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.



मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २९ ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी (दि २९) रात्री उशिरा १:३० वाजल्यापासून रविवारी (३० मार्च) पहाटे ४ : ३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. दरम्यानच्या काळात अंबरनाथ ते बदलापूरमधील रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. ब्लॉक काळात अंबरनाथ ते कर्जतदरम्यान कोणतीही लोकलसेवा सुरू राहणार नाही, तर काही रेल्वेसेवा कमी- जास्त प्रमाणात रद्द केल्या जातील. लोकल सेवांमध्ये शनिवारी रात्री ११ :१३ मिनिटांनी निघणारी परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत जाणार असून ११:५१ वाजता निघणारी सीएसएमटी- बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे.


मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम