Railway Megablock Update : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता रविवारी नाही तर 'या' दिवशी असणारा मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : रविवार म्हटलं कि सुट्टीच्या दिवशी फिरणं होत. पण मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडतात. गाड्या उशिराने असतील तर प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता शनिवारीसुद्धा घेण्यात येणाऱ्या पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.



मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २९ ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी (दि २९) रात्री उशिरा १:३० वाजल्यापासून रविवारी (३० मार्च) पहाटे ४ : ३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. दरम्यानच्या काळात अंबरनाथ ते बदलापूरमधील रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. ब्लॉक काळात अंबरनाथ ते कर्जतदरम्यान कोणतीही लोकलसेवा सुरू राहणार नाही, तर काही रेल्वेसेवा कमी- जास्त प्रमाणात रद्द केल्या जातील. लोकल सेवांमध्ये शनिवारी रात्री ११ :१३ मिनिटांनी निघणारी परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत जाणार असून ११:५१ वाजता निघणारी सीएसएमटी- बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे.


मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंच्या नावावर बाराशे एकर जमीन असल्याचा दावा खोटा

सोशल मीडियावरील दिशाभूल महागात; खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल मुंबई : राज्याचे महसूल मंत्री

Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार

दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणी मुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची

भारतीय जहाज ग्रीन सान्वी' ४४,००० टन एलपीजी घेऊन होर्मुझहून रवाना

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे