Kl Rahul : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल करणार कमबॅक

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्यांनी सोमवारी पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या १ विकेटने रोमांचक विजय मिळवला. तथापि, सामन्यात डीसीसाठी केएल राहुलची मोठी उणीव भासली. तो या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. दिल्लीच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी राहुलची पत्नी आथिया शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यासाठी संघ व्यवस्थापनाने राहुलला पहिला सामना न खेळण्यास विशेष परवानगी दिली होती.


राहुल हा डीसी लाइनअपमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याला आयपीएल २०२५च्या लिलावात १४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. राहुलचे आयपीएलमध्ये कधी पुनरागमन होईल, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अखेर त्याच्या परतीची तारीख समोर आली आहे. ज्यामुळे डीसी चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.



केएल राहुल रविवारी, ३० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल. ही लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. राहुल आयपीएल २०२४ पासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्याला २०२४ च्या टी-२० विश्वचषक संघातही स्थान मिळवता आले नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर केला आहे. तो टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली मुंबईत सराव केला.


आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी हैदराबाद संघाने १३ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स ११ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. विशाखापट्टणम स्टेडियमवर आतापर्यंत त्यांच्यात एकही सामना झालेला नाही.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात