Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्जचे पर्याय मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते यामुळे अनेकांचे पैसे वाचू शकतात. आम्ही बोलत आहोत १७४८ रूपयांच्या जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल... हा प्लान केवळ कमी किंमतीलाच नाही तर यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कंपनी यात तुम्हाला डेटा ऑफर करत नाही. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळतात.


जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच ११ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनी यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी ऑफर करते. यात तुम्हाला डेटा मिळत नाही.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा प्लान हवा आहे. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.


कंपनी जिओ टीव्हीचा अॅक्सेसही देत आहे. सोबतच तुम्हाला जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्ही ५० जीबी डेटा स्टोर करू शकता. व्हॅल्यू पॅकमध्ये ४४८ रूपयांचे कॉलिंग प्लान येतो. यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी प्लानवरील सर्व सुविधा मिळतील.


कंपनी १८९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच तुम्हाला कॉलिंग, एसएमएससोबत २ जीबी डेटाही मिळतो.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण