IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने चेन्नईला चेपॉकमध्ये हरवले, मिळवला ५० धावांनी विजय

चेपॉक: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ८व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला ५० धावांनी हरवले. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ ८ बाद १४६ धावाच करता आल्या. ५० धावांनी आरसीबीने हा सामना जिंकला आहे.


तब्बल ६१५५ दिवसांनी आरसीबीने चेन्नईला चेन्नईच्या मैदानात हरवून दाखवले. २००८मध्ये पहिल्यांदा आरबीसीने चेन्नईला त्यांच्याच मैदानात हरवले होते. त्यानंतर आरसीबीला चेन्नईला हरवण्यासाठी १७ वर्षे वाट पाहायला लागली.चेन्नईने याआधी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चार विकेटनी हरवले होते. तर दुसरीकडे आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सला सात विकेटनी पराभूत केले होते.


आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खराब राहिली. सीएसकेने पावरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. आधी जोश हेझलवूडने दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने तिसरी विकेट घेतली. त्यानंतर सॅम करन ८ धावा करून परतला. यावेळी चेन्नईची धावसंख्या ४ बाद ५२ इतकी होती.


यानंतर यश दयालने सीएसकेलेला दोन मोठे झटके दिले. दयालने सेट झालेल्या रचिन रवींद्रला बोल्ड केले. त्यानंतर शिवम दुबेला बाद केले. रवींद्रने ५ चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ३१ बॉलवर ४१ धावा केल्या. तर शिवम दुबेने दोन चौकार आणि एक सिक्सच्या मदतीने १९ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, आरसीबीने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना सात बाद १९६ धावा केल्या होत्या.बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली. सलामीवीर फिल सॉल्टने ३२ धावा केल्या. देवदत्त पड्डिकलने २७ धावा ठोकल्या. टीम डेविड जबरदस्त खेळला. त्याने ८ बॉलमध्ये २२ धावा तडकावल्या. शेवटच्या षटकांत डेविडने ३ षटकार ठोकले. त्यामुळे बंगळुरूला ही मोठी धावसंख्या गाठता आली.


Comments
Add Comment

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि

घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका