सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जरूर खा कच्चा लसूण, मिळतील हे फायदे

मुंबई: लसूणचा वापर भारतीय जेवणात फोडणीच्या रूपात केला जातो. यामुळे खाण्याचा स्वाद वाढतोच. सोबतच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लसूण एक आरोग्यदायी मसाल्याचा पदार्थ आहे. यात एलिसिन नावाचा घटक असतो. एलिसिनमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.


लसूणचे सेवन रिकाम्या पोटी करणे फायदेशीर मानले जाते. हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका मिळते.


ज्या लोकांना बद्धकोष्ठता, पोट फुगणे तसेच करपट ढेकर या समस्या असतील तर त्यांनी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन जरूर करावे.


हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात.


लसूणमध्ये अनेक असे घटक आढळतात जे पोट आणि कमरेजवळची चरबी वेगाने घटवतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे लिपिड प्रोफाईल व्यवस्थित करण्यास मदत होते. लसणीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुण असतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने आतडे मजबूत होतात.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे