Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे 'या' तारखेला राहणार बँका बंद!

मुंबई : नवीन महिन्याला सुरुवात होताच आरबीआयकडून (RBI) बँकींग सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार ३१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त (Eid Holiday) महाराष्ट्रात आणि भारतातील बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती मात्र आता आरबीआयने नवीन निर्देश जारी करत त्या दिवशी सुट्टी (Bank Holiday) रद्द केली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँकिंग सेवा सुरु राहणार आहेत. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण काय.



येत्या १ एप्रिल २०२५ पासून नवं आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसाय संस्थेत बदल होत राहतात. आरबीआयकडून (RBI) देखील नवं वर्षात देशभरातील सर्व बँकिगच्या नियमावलीत बदल केले जातात. दरम्यान, ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत.


त्याचबरोबर. रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुट्टी १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे.



बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा राहणार सुरु?


बँक सुट्ट्यांच्या (Bank Holiday) दिवशी ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात. तसेच सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अ‍ॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. या दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.

Comments
Add Comment

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या