जोफ्रा आर्चरच्या रडीचा डावामुळे क्विंटन डी कॉक शतकापासून वंचित

सोशल मीडियावर ट्रोल होतोय; मुद्दाम वाईड बॉल टाकल्याचा आरोप


मुंबई : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर आर्चरवर टीका करत त्याने क्विंटन डी कॉकचे शतक रोखण्यासाठी कपटी डाव खेळल्याचा आरोप केला आहे.


बुधवारी गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या विजयाचे खाते उघडले. कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना १५ चेंडू शिल्लक असताना जिंकला. यावेळी केकेआरचा फलंदाज क्विंटन डी कॉकने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ६१ चेंडूत नाबाद ९७ रन्स केले. क्विंटन डी कॉकने १५९.०१ च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. यावेळी त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ६ सिक्स लगावले. या खेळीसाठी क्विंटन डी कॉकला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला.



काय केले जोफ्रा आर्चरने?


कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी क्विंटन डी कॉक ८१ रन्स करून त्याच्या तिसऱ्या आयपीएल शतकाच्या जवळ होता. यावेळी जोफ्रा आर्चर केकेआरच्या डावातील १८ वी ओव्हर टाकत होता. क्विंटन डी कॉकला तिसरे आयपीएल शतक पूर्ण करण्यासाठी १९ रन्सची आवश्यकता होती आणि कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. १८ व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या पहिल्या दोन चेंडूंवर क्विंटन डी कॉकने एक चौकार आणि एक सिक्स मारला. यानंतर क्विंटन डिकॉकचा स्कोर ९१ झाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. क्विंटन डी कॉकला शतक पूर्ण करण्यासाठी ९ रन्सची गरज होती. मात्र यानंतर जोफ्रा आर्चरने जे केले, त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले. याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला फक्त ५ रन्स शिल्लक राहिले.



सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल


पुढच्याच बॉलवर क्विंटन डी कॉकने सिक्स मारला. पण तो ९७ रन्सवर नाबाद राहिला. क्विंटन डी कॉकचे शतक रोखल्यामुळे जोफ्रा आर्चरवर आरोप लावला जात आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून आरोप केला जातोय की, जोफ्रा आर्चरने १८ व्या ओव्हरमध्ये जाणूनबुजून दोन वाईड बॉल टाकले. जेणेकरून क्विंटन डी कॉक त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही.

Comments
Add Comment

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने