Amit Shah : लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक संमत

देशाच्या हद्दीत लोकांच्या येण्या-जाण्यावर आता राहणार लक्ष


नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशांचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.


स्थलांतर हा एक वेगळा मुद्दा नाही. देशातील अनेक प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत. आपल्या देशाच्या हद्दीत कोण येते? ते कधी येते? ते किती काळासाठी येते? आणि ते कोणत्या उद्देशाने येते? देशाच्या सुरक्षेसाठी हे जाणून घेण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे, असे सांगत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक सादर केले, ते संमतही करण्यात आले.



गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे भारतात येणाऱ्या लोकांचा डेटाबेस आपोआप तयार होणार आहे.


इमिग्रेशन आणि परदेशी लोकांबाबतचे विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर, विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.



घुसखोरीसाठी आलेल्यांवर कडक कारवाई


स्वातंत्र्याच्या वेळी देशाची फाळणी घाईघाईत झाली आणि हिंदू आणि शिखांनी भरलेल्या गाड्यांची कत्तल करण्यात आली. तेव्हा नेहरूजी आणि गांधीजींनी सांगितले होते की तुम्ही तिथेच राहा. जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना भारताचे नागरिक मानले जाईल. जे लोक येथे आपला धर्म आणि कुटुंब वाचवण्यासाठी आले आहेत ते खरे निर्वासित आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, कोणीही भारतात येऊ शकतो. तुमचे स्वागत आहे. घुसखोरी करण्यासाठी आलेल्यांवर आम्ही कडक कारवाई करू. फाळणीचे भयानक परिणाम सहन करणाऱ्यांनाच आम्ही नागरिकत्व देऊ, असे शहा यांनी म्हटले.

Comments
Add Comment

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या