Amit Shah : लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक संमत

  111

देशाच्या हद्दीत लोकांच्या येण्या-जाण्यावर आता राहणार लक्ष


नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशांचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.


स्थलांतर हा एक वेगळा मुद्दा नाही. देशातील अनेक प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत. आपल्या देशाच्या हद्दीत कोण येते? ते कधी येते? ते किती काळासाठी येते? आणि ते कोणत्या उद्देशाने येते? देशाच्या सुरक्षेसाठी हे जाणून घेण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे, असे सांगत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक सादर केले, ते संमतही करण्यात आले.



गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे भारतात येणाऱ्या लोकांचा डेटाबेस आपोआप तयार होणार आहे.


इमिग्रेशन आणि परदेशी लोकांबाबतचे विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर, विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.



घुसखोरीसाठी आलेल्यांवर कडक कारवाई


स्वातंत्र्याच्या वेळी देशाची फाळणी घाईघाईत झाली आणि हिंदू आणि शिखांनी भरलेल्या गाड्यांची कत्तल करण्यात आली. तेव्हा नेहरूजी आणि गांधीजींनी सांगितले होते की तुम्ही तिथेच राहा. जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना भारताचे नागरिक मानले जाईल. जे लोक येथे आपला धर्म आणि कुटुंब वाचवण्यासाठी आले आहेत ते खरे निर्वासित आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, कोणीही भारतात येऊ शकतो. तुमचे स्वागत आहे. घुसखोरी करण्यासाठी आलेल्यांवर आम्ही कडक कारवाई करू. फाळणीचे भयानक परिणाम सहन करणाऱ्यांनाच आम्ही नागरिकत्व देऊ, असे शहा यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे