KKR VS RR : केकेआरचा सुनील नरेनला १६२८ दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर

  61

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठेवला. त्याने नाबाद ९७ धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेत भरली ती म्हणजे या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या साथीला सलामीला आलेला मोईन अली. मोईन अलीला कालच्या सामन्यात सुनील नरेनच्या जागी संघात घेण्यात आले होते.



गेल्या अनेक हंगामांपासून सुनील नरेन हा केकेआर संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. काल १६२८ दिवसांनी पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुनील नरेन याच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सुनील नरेनच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला.

प्रकृती ठिक नसल्याने संघातून वगळले


कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने सुनील नरेनच्या न खेळण्यामागचे कारण समोर आले. गुवाहाटीला झालेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजिंक्य रहाणे याने प्लेईंग ११मध्ये बदल केल्याचे सांगितले. सुनील नरेनच्या जागी मोईन अलीला संघात घेण्यात आल्याचे त्याने जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना नरेनला दुखापत झाली आहे का, अशी शंका वाटली. मात्र, सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट