KKR VS RR : केकेआरचा सुनील नरेनला १६२८ दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठेवला. त्याने नाबाद ९७ धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेत भरली ती म्हणजे या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या साथीला सलामीला आलेला मोईन अली. मोईन अलीला कालच्या सामन्यात सुनील नरेनच्या जागी संघात घेण्यात आले होते.



गेल्या अनेक हंगामांपासून सुनील नरेन हा केकेआर संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. काल १६२८ दिवसांनी पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुनील नरेन याच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सुनील नरेनच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला.

प्रकृती ठिक नसल्याने संघातून वगळले


कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने सुनील नरेनच्या न खेळण्यामागचे कारण समोर आले. गुवाहाटीला झालेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजिंक्य रहाणे याने प्लेईंग ११मध्ये बदल केल्याचे सांगितले. सुनील नरेनच्या जागी मोईन अलीला संघात घेण्यात आल्याचे त्याने जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना नरेनला दुखापत झाली आहे का, अशी शंका वाटली. मात्र, सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत