Girgaon Gudi Padwa : अभिजात मराठीचा गौरव करत गिरगावकर करणार हिंदू नववर्षाचे स्वागत

मुंबई : प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा दिल्याचे औचित्य साधून सर्व भारतीय भाषांना व्यवहारभाषा म्हणून वापरण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.



शहिद गौरव समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित संघाचे कार्य आणि विस्तार दर्शवणारा चित्ररथ वैशिष्ट्यपूर्ण असेल. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा अभिजात मराठी भाषेवरील चित्ररथ, सांस्कृतिक विभागाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावरील चित्ररथ यात्रेचे केंद्रबिंदू ठरतील. सकाळी ११ वाजता ठाकूरद्वार येथे नववर्ष संकल्प सभेचे आयोजन केले आहे. या संकल्प सभेसाठी महाराष्ट्रातील ३ पद्मश्री सर्वश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार वासुदेव कामत आणि सुलेखनकार अच्युत पालव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.


गेली सहा वर्षे वाचकांच्या पसंतीस उतरलेला चैत्र स्वागत नावाचा नववर्ष स्वागत विशेषांक यावर्षी २३ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे गिरगावांतील विविध चौकात छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर आगरकर, कार्याध्यक्ष आशुतोष वेदक, सचिव स्वप्निल गुरव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक