Dubai connected to Mumbai by rail : दुबई ते मुंबईला रेल्वे मार्गाने जोडणार;संयुक्त अमिरातीची योजना

  62

मुंबई : दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना संयुक्त अमिरातीच्या डोक्यात घोळू लागली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा २ हजार किलोमीटर लांबीचा हा पहिला रेल्वे मार्ग ठरेल.


मध्यपूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जातो. अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल्शेही यांनी याप्रकल्पाची घोषणा केली. दुबई ते मुंबई जोडणारी समुद्राखालची रेल्वे उभारणे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास करण्याची योजना हाती घेतल्याचे ते म्हणाले. दुबई ते मुंबई रेल्वे ही प्रचंड वेगवान असेल आणि हा रेल्वे मार्ग अंदाजे २ हजार किलोमीटर लांबीचा असू शकेल.



ही रेल्वे पूर्णत: समुद्राखालून जाईल. मुंबईहून निघणारी रेल्वे संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरात पोहोचेल. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही देशातला प्रवास आणि व्यापार वाढविण्याबरोबरच उभय देशात अरबांच्या तेलाची भारताला निर्यात आणि भारताच्या नर्मदेचे पाणी अरब देशांना आयात करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.


अर्थात, दुबई-मुंबई जोडणार्या रेल्वे प्रकल्पाची कल्पना तूर्त कागदावरच आहे. या प्रकल्पाची आधी व्यवहार्यता तपासली जाईल. या प्रकल्पाच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाजू तपासल्या जातील. कारण, इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ चमत्कार म्हणूनच या प्रकल्पाकडे भविष्यात पाहिले जाऊ शकते.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की