Dubai connected to Mumbai by rail : दुबई ते मुंबईला रेल्वे मार्गाने जोडणार;संयुक्त अमिरातीची योजना

मुंबई : दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना संयुक्त अमिरातीच्या डोक्यात घोळू लागली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा २ हजार किलोमीटर लांबीचा हा पहिला रेल्वे मार्ग ठरेल.


मध्यपूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जातो. अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल्शेही यांनी याप्रकल्पाची घोषणा केली. दुबई ते मुंबई जोडणारी समुद्राखालची रेल्वे उभारणे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास करण्याची योजना हाती घेतल्याचे ते म्हणाले. दुबई ते मुंबई रेल्वे ही प्रचंड वेगवान असेल आणि हा रेल्वे मार्ग अंदाजे २ हजार किलोमीटर लांबीचा असू शकेल.



ही रेल्वे पूर्णत: समुद्राखालून जाईल. मुंबईहून निघणारी रेल्वे संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरात पोहोचेल. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही देशातला प्रवास आणि व्यापार वाढविण्याबरोबरच उभय देशात अरबांच्या तेलाची भारताला निर्यात आणि भारताच्या नर्मदेचे पाणी अरब देशांना आयात करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.


अर्थात, दुबई-मुंबई जोडणार्या रेल्वे प्रकल्पाची कल्पना तूर्त कागदावरच आहे. या प्रकल्पाची आधी व्यवहार्यता तपासली जाईल. या प्रकल्पाच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाजू तपासल्या जातील. कारण, इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ चमत्कार म्हणूनच या प्रकल्पाकडे भविष्यात पाहिले जाऊ शकते.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी