PM Kisan Scheme : बांगलादेशी घेत होते पीएम-किसान योजनेचा लाभ

  70

एकूण १८१ बोगस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल


नाशिक : कळवण तालुक्यामध्ये बांगलादेशी शेतकऱ्यांनी शेतकरी पीक विम्याचा (PM Kisan Scheme) लाभ घेतल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यामध्ये १८१ बोगस शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कळवण भागाचा दौरा करून या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी या ठिकाणी बोगस शेतकरी असल्याचे सांगत शासनाच्या पंतप्रधान किसान विमा योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कृषी अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला.



मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात किरीट सोमय्या यांचे आंदोलन सुरूच आहे आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर आपले लक्ष केंद्रित केले होते. बाबत कळवणच्या तालुका कृषी अधिकारी मिलन म्हस्के यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये पंतप्रधान किसान विमा योजनेचा सुमारे १८१ शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शासनाची दोन कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी शेतकरी नसल्याचे समोर आल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी तपास करीत असून हे सर्व नागरिक हे बांगलादेशी असल्याचे निदर्शनास प्रथमदर्शनी आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर हे अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक