Share

सद्गुरू वामनराव पै

आम्ही कर्मकांडावर टीका किंवा ताशेरे ओढतो याचे कारण हेच आहे की आपल्या कर्मठ लोकांनी आपल्या धर्माचे, राज्याचे, देशाचे फार नुकसान केले. आपले छत्रपती शिवाजी महाराज किती महान, पण त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी देखील बरेच काही घडले असे म्हणतात. अखेरीस काशीवरून गागाभट्ट यांना राज्याभिषेक करण्यासाठी बोलाविण्यात आले. कर्मठपणा किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत. ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत, त्यालाच आपण सुखाने जगू देत नाहीत. जीवनविद्या तर असे सांगते की, जगातील सर्व धर्माचे सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करीत असतात, पण प्रत्यक्षात मात्र, ते जे काही करतात त्या कर्मकांडात देवही नसतो व धर्मही नसतो. सांगायचा मुद्दा, धर्म वाईट नाही, धर्म चांगलाच आहे. धर्माची सुरेख व्याख्या आहे. “ज्याने समाजाची सुरेख धारणा होते, तोच खरा धर्म”. धर्म हा पाहिजेच, पण कुठला धर्म? मानवधर्म. हा मानवधर्म म्हणजे काय? कित्येकदा बरीच माणसे केवळ दिसण्यापुरती माणसासारखी दिसतात, पण त्यांची वागणूक ही माणसांसारखी नसते. जेव्हा माणूस हा माणसासारखा वागायला लागेल तोच खरा मानवधर्म. किती सोपे आहे बघा.

माणूस माणसासारखा वागला की त्याच्या ठिकाणी असेल तोच मानवधर्म. पण आज तसे कोणी वागतंय का? इतर प्राणी त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात, मात्र माणूस बरेचदा मानवधर्माला अनुसरून वागत नाही. वाघ हा वाघासारखाच वागणार, मात्र तो कधीही गाईसारखा वागणार नाही. कितीही भूक लागली तरीही चारा, गवत खाणार नाही. सर्प, गरुड, लांडगा हे सर्व इतर पशु-पक्षी देखील जन्माला आल्यापासून त्यांना निसर्गाने नेमून दिल्यासारखे जगतात. केवळ मनुष्य हा एकाच असा प्राणी आहे जो जन्माला येतो माणूस म्हणून मात्र माणसासारखा वागत, जगत नाही. हे असे का होते? याचे कारण म्हणजे त्यांना जी शिकवण घरातून, शाळा-कॉलेजमधून, धर्ममार्तंडांकडून म्हणजेच संस्कारातून, शिक्षणातून मिळते, त्यातून हे सगळे घडते. कडवटपणा, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव निर्माण होतात, त्यातून सगळे बिघडत जाते. मी नेहमी सांगतो की, जगात कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ नाही, सगळेच श्रेष्ठ आहेत. कारण सर्वच या निसर्गाच्या व्यवस्थेत उपयुक्त आहेत.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago