मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “गद्दार कोण? याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. आता जनतेच्या न्यायालयातही उत्तर मिळाले आहे,” असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले, मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निकालामुळे शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणत भुई ठोकत बसा. तुम्हाला दार बंद करून पक्षाचे दुकान बंद करावे लागेल. गद्दार कोण? याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. पण, जनतेच्या न्यायालयात सुद्धा गद्दार कोण? खुद्दार कोण? याचा निकाल दिला आहे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, फक्त टीका करून राजकारण होत नाही, काम करावे लागते!
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “प्रत्येक गोष्टीसाठी कारण सांगणाऱ्यांचा काळ संपला. आम्ही विकासाची तुफान बॅटिंग केली आणि विरोधक आमच्या स्कोरच्या पाठलागात क्लीनबोल्ड झाले. आमची नवी इनिंग सुरू झाली असून आमची बॅटिंग टी-२० सारखी आहे—कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या!”
“कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘मोठे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे. गरीबांच्या तोंडची खिचडी खाणारे.’ तुमचा खोटारडेपणा सगळ्यांना कळून चुकला आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता…,’ ‘जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमें क्या गिराएंगे, हमारे दुश्मनों से कहो अपना कद ऊँचा करें… बराबरी होगी, तोही मुकाबले मैं मजा होगी,’” अशी शेरोशायरी करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल…. बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र, आज काय चाललंय, ते जनता पाहतेय.
शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितले, “अडीच वर्षे रोज आरोप झाले. पण, आम्ही कोणाची चिंता करत नाही. विरोधकांनी स्वतःची काळजी करावी. जनता ठरवते कोणाला सत्ता द्यायची. रोज शिव्या-शाप देऊन काहीही साध्य होत नाही. दुसऱ्यांची लाईन कापण्याऐवजी स्वतःची मोठी करा!”
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंच्या स्टाईलमध्ये शेरोशायरी करत टोले लगावले,
“मोठे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे,
गरीबांच्या तोंडची खिचडी खाणारे, खोटारडेपणा उघड झाला रे!”
एकनाथ (Eknath Shinde) शिंदेंनी कुणाल कामरा याच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “पाखंडी लोक पुढे करून शिखंडी लोक आधार घेत आहेत. कोणाच्या सुपारीवर आम्ही काही बोलत नाही, पण सत्य लपून राहत नाही.”
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंच्या “एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये आहेत” या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत म्हणाले, “काही मिस्टर बीन डस्टबीनचा उल्लेख करत होते, पण डांबरचे सांबर कोणी खाल्ले?”
ते पुढे म्हणाले, “सामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती होती, पण त्याच कचऱ्यातून ऊर्जा निर्माण झाली आणि शॉक बसला. त्यातून अजून काहीजण सावरले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबीनमध्ये टाकली गेली होती. आम्ही तिला बाहेर काढले!”
मुंबईतील रस्त्यांच्या विकासावर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “७०१ किमी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. गेल्या १०-१५ वर्षांत ३००० कोटी रुपये वाया गेले. आता डांबरात हात काळे करता येणार नाही. राजाचा जीव पोपटात असतो, तसा काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. सिमेंटच्या रस्त्याची चौकशी करावी, अशी काहीजण मागणी करतायेत. चौकशी तर झालीच पाहिजे. परंतु, १५ वर्षांत डांबरचे सांबर कुणी खाल्ले, हे सुद्धा समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदेंनी ठाकरेंना स्पष्ट इशारा दिला, “काही जण तीन-तीन ग्लास पाणी पीतायत, चहा पितायत… मला जास्त बोलायला लावू नका. बात निकलेगी तो दूर तक जायेगी!” असा इशारा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचा नाव न घेता दिला आहे.
दरम्यान, विधानपरिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या या भाषणामुळे आगामी राजकीय समीकरणे अधिक तापणार, हे निश्चित!
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…