Western Railway : भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वे ‘मालामाल’

  21

वर्षभरात तिजोरीमध्ये ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा


मुंबई : पश्चिम रेल्वेने (Western Railway) ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा भाग म्हणून रेल्वेच्या हद्दीतील भंगार गोळा करून त्यांची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ या वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.


पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) हद्दीत मोठ्या प्रमाणावर भंगार पडून आहे. त्यात रेल्वे रुळाचे भाग, खांब, धातूचे विविध साहित्य आदींचा समावेश आहे. या भंगारामुळे जागा अडून राहते, अस्वच्छता होते, तसेच पावसाळ्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या हद्दीतील भंगार साहित्य हटविण्याचा निर्णय घेतला आणि ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली. या मोहिमेत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.



शुन्य भंगार मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यात लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्याचबरोबर कालबाह्य झालेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिन, जुने डबे, माल डबे, चाक आदींची विक्री करण्यात आली. या भंगार साहित्याच्या विक्रीतून पश्चिम रेल्वेला २१ मार्च २०२५ पर्यंत ५०७.७८ कोटी रुपये मिळाले असून रेल्वे मंडळाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ते २७ टक्के जास्त आहे. पडीत भंगारामुळे अस्वच्छ झालेला परिसर या मोहिमेमुळे स्वच्छ झाला आहे. अडगळीत पडलेल्या साहित्याची विक्री केल्याने, ती जागा मोकळी होते. त्यामुळे त्या जागेचा योग्य तो वापर करता येतो.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.