Western Railway : भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वे ‘मालामाल’

वर्षभरात तिजोरीमध्ये ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा


मुंबई : पश्चिम रेल्वेने (Western Railway) ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा भाग म्हणून रेल्वेच्या हद्दीतील भंगार गोळा करून त्यांची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ या वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.


पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) हद्दीत मोठ्या प्रमाणावर भंगार पडून आहे. त्यात रेल्वे रुळाचे भाग, खांब, धातूचे विविध साहित्य आदींचा समावेश आहे. या भंगारामुळे जागा अडून राहते, अस्वच्छता होते, तसेच पावसाळ्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या हद्दीतील भंगार साहित्य हटविण्याचा निर्णय घेतला आणि ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली. या मोहिमेत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.



शुन्य भंगार मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यात लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्याचबरोबर कालबाह्य झालेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिन, जुने डबे, माल डबे, चाक आदींची विक्री करण्यात आली. या भंगार साहित्याच्या विक्रीतून पश्चिम रेल्वेला २१ मार्च २०२५ पर्यंत ५०७.७८ कोटी रुपये मिळाले असून रेल्वे मंडळाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ते २७ टक्के जास्त आहे. पडीत भंगारामुळे अस्वच्छ झालेला परिसर या मोहिमेमुळे स्वच्छ झाला आहे. अडगळीत पडलेल्या साहित्याची विक्री केल्याने, ती जागा मोकळी होते. त्यामुळे त्या जागेचा योग्य तो वापर करता येतो.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी