अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार

  58

मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर स्नेहल जगताप पक्षांतर करणार आहेत. उद्धव गटात असलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी उद्धव गटाच्या तिकिटावर, शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरत गोगावले विजयी झाले आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेतील भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या महायुतीत शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.



स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास भरत गोगावले यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याच्या ठरू शकतात; असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील विस्तारासाठी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या