अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर स्नेहल जगताप पक्षांतर करणार आहेत. उद्धव गटात असलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी उद्धव गटाच्या तिकिटावर, शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरत गोगावले विजयी झाले आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेतील भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या महायुतीत शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.



स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास भरत गोगावले यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याच्या ठरू शकतात; असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील विस्तारासाठी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल