विधान भवनात वीज पुरवठा खंडीत

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना दुपारी काही सेकंदांसाठी विधान भवनाच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनरेटर बॅकअप असल्यामुळे कामकाज ठप्प झाले नाही. पण दोन्ही सभागृहात दिवे चमकल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले.



याआधी सकाळच्या सत्रात विधानसभेत उपाध्यक्षांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर इतर विषयांतील कामकाज झाले.



शेवटच्या दिवशी विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार राम कदम यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणात तत्कालीन उद्धव सरकारने अधिकारांचा गैरवापर करत पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचे समर्थक रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत होते, असाही आरोप आमदार राम कदम यांनी सभागृहात बोलताना केला. राम कदम यांनी आरोप करताच उद्धव समर्थकांनी सभागृहात नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण राम कदम त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. उद्धव सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला की नाही आणि केला असल्यास नेमकी काय कृती केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली. ही मागणी त्यांनी सभागृहात बोलताना केली.
Comments
Add Comment

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना