विधान भवनात वीज पुरवठा खंडीत

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना दुपारी काही सेकंदांसाठी विधान भवनाच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनरेटर बॅकअप असल्यामुळे कामकाज ठप्प झाले नाही. पण दोन्ही सभागृहात दिवे चमकल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले.



याआधी सकाळच्या सत्रात विधानसभेत उपाध्यक्षांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर इतर विषयांतील कामकाज झाले.



शेवटच्या दिवशी विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार राम कदम यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणात तत्कालीन उद्धव सरकारने अधिकारांचा गैरवापर करत पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचे समर्थक रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत होते, असाही आरोप आमदार राम कदम यांनी सभागृहात बोलताना केला. राम कदम यांनी आरोप करताच उद्धव समर्थकांनी सभागृहात नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण राम कदम त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. उद्धव सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला की नाही आणि केला असल्यास नेमकी काय कृती केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली. ही मागणी त्यांनी सभागृहात बोलताना केली.
Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे