विधान भवनात वीज पुरवठा खंडीत

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना दुपारी काही सेकंदांसाठी विधान भवनाच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनरेटर बॅकअप असल्यामुळे कामकाज ठप्प झाले नाही. पण दोन्ही सभागृहात दिवे चमकल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले.



याआधी सकाळच्या सत्रात विधानसभेत उपाध्यक्षांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर इतर विषयांतील कामकाज झाले.



शेवटच्या दिवशी विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार राम कदम यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणात तत्कालीन उद्धव सरकारने अधिकारांचा गैरवापर करत पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचे समर्थक रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत होते, असाही आरोप आमदार राम कदम यांनी सभागृहात बोलताना केला. राम कदम यांनी आरोप करताच उद्धव समर्थकांनी सभागृहात नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण राम कदम त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. उद्धव सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला की नाही आणि केला असल्यास नेमकी काय कृती केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली. ही मागणी त्यांनी सभागृहात बोलताना केली.
Comments
Add Comment

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००