मुंबई : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने एकजूट होत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. शिंदे यांच्यावर पक्षपाती कारभार करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात या मुद्द्याला उचलून धरले होते. यासंदर्भात अधिकृत पत्रही देण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावाबाबत आता मोठी घडामोड समोर आली असून, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, सरकारच्या निर्णयांवर अंकुश ठेवणे आणि पर्यायी धोरण सुचवणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. मात्र, महाराष्ट्र विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहात सभापती आणि अध्यक्ष पक्षपाती व एकांगी भूमिका घेत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
या संदर्भात राज्यपालांना पत्र देऊन विधानसभेच्या कार्यवाहीत संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालवले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यास संधी दिली जात नाही, त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जात नाही, असा आरोप देखील करण्यात आला होता.
परंतु, आता महाविकास आघाडीने हा प्रस्ताव मागे घेतला आहे. अंबादास दानवे यांनी २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना समाधानकारक आश्वासन दिले असल्याने सभागृहात खेळीमेळीचे वातावरण टिकावे, यासाठी प्रस्ताव मागे घेत असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर, एकनाथ खडसे, सुनील शिंदे, प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक आमदारांच्या सह्या आहेत.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…