Maharashtra Politics : ‘मविआ’चा रिव्हर्स गिअर; राम शिंदेंविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मागे का?

मुंबई : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने एकजूट होत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. शिंदे यांच्यावर पक्षपाती कारभार करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात या मुद्द्याला उचलून धरले होते. यासंदर्भात अधिकृत पत्रही देण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावाबाबत आता मोठी घडामोड समोर आली असून, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.



विरोधकांचा आरोप आणि मागणी


विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, सरकारच्या निर्णयांवर अंकुश ठेवणे आणि पर्यायी धोरण सुचवणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. मात्र, महाराष्ट्र विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहात सभापती आणि अध्यक्ष पक्षपाती व एकांगी भूमिका घेत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.



या संदर्भात राज्यपालांना पत्र देऊन विधानसभेच्या कार्यवाहीत संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालवले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यास संधी दिली जात नाही, त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जात नाही, असा आरोप देखील करण्यात आला होता.



अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यामागचे कारण


परंतु, आता महाविकास आघाडीने हा प्रस्ताव मागे घेतला आहे. अंबादास दानवे यांनी २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.


मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना समाधानकारक आश्वासन दिले असल्याने सभागृहात खेळीमेळीचे वातावरण टिकावे, यासाठी प्रस्ताव मागे घेत असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर, एकनाथ खडसे, सुनील शिंदे, प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक आमदारांच्या सह्या आहेत.

Comments
Add Comment

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक