IPL 2025 : केकेआरने खोलले विजयाचे खाते, डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानची शरणागती

  55

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील सहावा सामना बुधवारी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. गुवाहाटीच्या बारसापार क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना केकेआरने ८ विकेट राखत जिंकला.


क्विंटन डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानने शरणागती पत्करली. डी कॉकने या सामन्यात ९७ धावा तडकावल्या. त्याने या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. कर्णधार अजिंक्य रहाणेला १८ धावाच करता आल्या. अखेर कोलकाताने ८ विकेट आणि १५ बॉल राखत लक्ष्य गाठले.


यासोबतच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातीली केकेआर संघाने या आयपीएल हंगामातील विजयाचे खाते खोलले. हा संघाचा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला होता.


तर राजस्थानच्या संघाचा या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे. त्यांना आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळला होता. यात त्याने ४४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. पहिल्या तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या जागी राजस्थान संघाचे नेतृत्व रियान पराग करत आहे.


सामन्यात राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५१ धावा केल्या होत्या. संघासाठी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने २८ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी केली. तर यशस्वी जायसवालने २४ बॉलमध्ये २९ धावा केल्या. कर्णधार रियान परागने १५ बॉलमध्ये २५ धावा ठोकल्या.


Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र