IPL 2025 : केकेआरने खोलले विजयाचे खाते, डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानची शरणागती

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील सहावा सामना बुधवारी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. गुवाहाटीच्या बारसापार क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना केकेआरने ८ विकेट राखत जिंकला.


क्विंटन डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानने शरणागती पत्करली. डी कॉकने या सामन्यात ९७ धावा तडकावल्या. त्याने या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. कर्णधार अजिंक्य रहाणेला १८ धावाच करता आल्या. अखेर कोलकाताने ८ विकेट आणि १५ बॉल राखत लक्ष्य गाठले.


यासोबतच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातीली केकेआर संघाने या आयपीएल हंगामातील विजयाचे खाते खोलले. हा संघाचा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला होता.


तर राजस्थानच्या संघाचा या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे. त्यांना आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळला होता. यात त्याने ४४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. पहिल्या तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या जागी राजस्थान संघाचे नेतृत्व रियान पराग करत आहे.


सामन्यात राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५१ धावा केल्या होत्या. संघासाठी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने २८ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी केली. तर यशस्वी जायसवालने २४ बॉलमध्ये २९ धावा केल्या. कर्णधार रियान परागने १५ बॉलमध्ये २५ धावा ठोकल्या.


Comments
Add Comment

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार