भारतावर १० वर्षात २५० अब्ज डॉलर्सने वाढले विदेशी कर्ज

  125

८ लाख ३९ हजार कोटींवर गेले महाराष्ट्रावरील कर्ज


नवी दिल्ली : भारतात गेल्या १० वर्षात विदेशी कर्ज २५० अब्ज डॉलर्सने वाढले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयामार्फत हे उत्तर देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ३१ मार्च २०१४ रोजी भारतावर विदेशी कर्ज किती होते? ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज किती वाढले आहे?
अर्थमंत्रालयाने मात्र सप्टेंबर २०२४ पर्यंतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार देशावर ७११.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विदेशी कर्ज आहे. मार्च २०१४ मध्ये ४४६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं विदेशी कर्ज होते. म्हणजेच गेल्या १० वर्षात भारतावरील विदेशी कर्ज २६५ अब्ज डॉलर्सने वाढले आहे.


वित्त मंत्रालयाने या उत्तरासोबत आणखी माहिती दिली. भारताने २०१३-१४ मध्ये विदेशी कर्जावर व्याज ११.२० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके दिले होते. २०२३-२४ मध्ये अंदाजे २७.१० अब्ज डॉलर्स इतके व्याज दिले आहे.


महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये महाराष्ट्रावर किती कर्ज आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रावरील कर्जाची रक्कम ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, तेव्हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक कर्ज महाराष्ट्रावर झाले आहे. महाराष्ट्रावरील कर्ज ८ लाख ३९ हजार कोटींवर गेले आहे. केंद्र आणि आरबीआयने राज्य सरकारांनी किती कर्ज काढावे, याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण २५ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे