भारतावर १० वर्षात २५० अब्ज डॉलर्सने वाढले विदेशी कर्ज

८ लाख ३९ हजार कोटींवर गेले महाराष्ट्रावरील कर्ज


नवी दिल्ली : भारतात गेल्या १० वर्षात विदेशी कर्ज २५० अब्ज डॉलर्सने वाढले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयामार्फत हे उत्तर देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ३१ मार्च २०१४ रोजी भारतावर विदेशी कर्ज किती होते? ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज किती वाढले आहे?
अर्थमंत्रालयाने मात्र सप्टेंबर २०२४ पर्यंतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार देशावर ७११.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विदेशी कर्ज आहे. मार्च २०१४ मध्ये ४४६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं विदेशी कर्ज होते. म्हणजेच गेल्या १० वर्षात भारतावरील विदेशी कर्ज २६५ अब्ज डॉलर्सने वाढले आहे.


वित्त मंत्रालयाने या उत्तरासोबत आणखी माहिती दिली. भारताने २०१३-१४ मध्ये विदेशी कर्जावर व्याज ११.२० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके दिले होते. २०२३-२४ मध्ये अंदाजे २७.१० अब्ज डॉलर्स इतके व्याज दिले आहे.


महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये महाराष्ट्रावर किती कर्ज आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रावरील कर्जाची रक्कम ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, तेव्हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक कर्ज महाराष्ट्रावर झाले आहे. महाराष्ट्रावरील कर्ज ८ लाख ३९ हजार कोटींवर गेले आहे. केंद्र आणि आरबीआयने राज्य सरकारांनी किती कर्ज काढावे, याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण २५ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी