भारतावर १० वर्षात २५० अब्ज डॉलर्सने वाढले विदेशी कर्ज

८ लाख ३९ हजार कोटींवर गेले महाराष्ट्रावरील कर्ज


नवी दिल्ली : भारतात गेल्या १० वर्षात विदेशी कर्ज २५० अब्ज डॉलर्सने वाढले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयामार्फत हे उत्तर देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ३१ मार्च २०१४ रोजी भारतावर विदेशी कर्ज किती होते? ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज किती वाढले आहे?
अर्थमंत्रालयाने मात्र सप्टेंबर २०२४ पर्यंतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार देशावर ७११.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे विदेशी कर्ज आहे. मार्च २०१४ मध्ये ४४६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं विदेशी कर्ज होते. म्हणजेच गेल्या १० वर्षात भारतावरील विदेशी कर्ज २६५ अब्ज डॉलर्सने वाढले आहे.


वित्त मंत्रालयाने या उत्तरासोबत आणखी माहिती दिली. भारताने २०१३-१४ मध्ये विदेशी कर्जावर व्याज ११.२० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके दिले होते. २०२३-२४ मध्ये अंदाजे २७.१० अब्ज डॉलर्स इतके व्याज दिले आहे.


महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये महाराष्ट्रावर किती कर्ज आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रावरील कर्जाची रक्कम ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, तेव्हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक कर्ज महाराष्ट्रावर झाले आहे. महाराष्ट्रावरील कर्ज ८ लाख ३९ हजार कोटींवर गेले आहे. केंद्र आणि आरबीआयने राज्य सरकारांनी किती कर्ज काढावे, याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण २५ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन