Yogi Adityanath : ‘इंडी’ आघाडीने सोरोसचा पैसा निवडणुकीत वापरला

लखनऊ : विरोधकांच्या इंडी आघाडीने लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा वापरला. त्या पैशातून भाजपच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा घणाघाती आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज, मंगळवारी एका मुलाखतीत केला.


यावेळी योग आदित्यनाथ म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकारने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण दिले आहे. अशाप्रकारे नियमबाह्य धर्माच्या आधारे आरक्षण देणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अपमान आहे, पण आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार जे बोलत आहेत, ते काँग्रेसकडून त्यांना मिळालेल्या राजकीय वारशातूनच बोलत असल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.



लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण भाजप विरुद्ध विरोधकांनी अपप्रचार केला होता. खोटा नॅरेटिव्ह चालवला होती. इंडि आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरला. त्यातून भाजप सरकार विरुद्ध अपप्रचार केला. विदेशी शक्तींना भारतामध्ये भाजपचे सरकार नको होते. जॉर्ज सोरोस यांनी तसे पूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी इंडि आघाडीला भरपूर पैसा पुरवून लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. इंडि आघाडीने त्यांचा पैसा वापरून देशद्रोह केला, असा घणाघाती आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यानंतर योगी आदित्यनाथ प्रथमच जाहीरपणे विदेशी हस्तक्षेपाबद्दल बोलले, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


दरम्यान, काही लोक देशात दुफळी माजवायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फक्त स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार मानून इतरांचा अपमान करतात. पण आता देशातील जनता असले खोटे बोलणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानायला तयार नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील