CET Exam Scam : सीईटी परीक्षेत घोटाळा प्रकरणी चौघे अटकेत

  156

मुंबई : राज्यात सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा (CET Exam Scam) उघडकीस आला असून एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हेगार उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या परराज्यातील असल्याची धक्कादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.



सीईटी कक्षातर्फे एमबीए, एमएमएस आणि अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी स्पॅम कॉलद्वारे मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ समिती नेमून चौकशीचे आदेश दिले.


चौकशी अहवालात आर्थिक व्यवहाराचे पुरावे समोर आले असून या रॅकेटचा फैलाव देशभरात असल्याचे स्पष्ट असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा अधिक तपास सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग