Rohit Pawar : केतकी चितळेला विसरले रोहित पवार, कामराला उत्तर देणाऱ्यांवर केली टीका

मुंबई : कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. यानंतर राजकारण तापले. या तापलेल्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी कुणालाही कविता करण्याचे, राजकीय विषयांवर व्यंगात्मक टीकाटीप्पणीचे स्वातंत्र्य आहे, असे सांगितले. केतकी चितळेच्या विषयाला सोयीस्कर बगल देत रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.



उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना केतकी चितळे नावाच्या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाटीप्पणी करण्यात आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. जेव्हा केतकीची पोस्ट व्हायरल झाली त्यावेळी मविआ सरकारने केतकीला अटक केली होती. केतकी चितळे ४० दिवस तुरुंगात होती. ही कारवाई झाली त्यावेळी रोहित पवार सत्ताधारी गटात होते. हे सगळे विसरुन रोहित पवारांनी कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना व्यक्तीस्वातंत्र्य हा विषय मांडण्याला प्राधान्य दिले.

नेमके काय घडले ?

स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराने एक कविता केली आहे. या कवितेत थेट कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. पण कवितेतून एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. या कवितेचा व्हिडीओ ट्वीट करताना उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने 'कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र' अशी प्रतिक्रिया शब्दांच्या स्वरुपात ट्वीट केली आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल