Rohit Pawar : केतकी चितळेला विसरले रोहित पवार, कामराला उत्तर देणाऱ्यांवर केली टीका

मुंबई : कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. यानंतर राजकारण तापले. या तापलेल्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार यांनी कुणालाही कविता करण्याचे, राजकीय विषयांवर व्यंगात्मक टीकाटीप्पणीचे स्वातंत्र्य आहे, असे सांगितले. केतकी चितळेच्या विषयाला सोयीस्कर बगल देत रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.



उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना केतकी चितळे नावाच्या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाटीप्पणी करण्यात आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. जेव्हा केतकीची पोस्ट व्हायरल झाली त्यावेळी मविआ सरकारने केतकीला अटक केली होती. केतकी चितळे ४० दिवस तुरुंगात होती. ही कारवाई झाली त्यावेळी रोहित पवार सत्ताधारी गटात होते. हे सगळे विसरुन रोहित पवारांनी कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना व्यक्तीस्वातंत्र्य हा विषय मांडण्याला प्राधान्य दिले.

नेमके काय घडले ?

स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराने एक कविता केली आहे. या कवितेत थेट कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. पण कवितेतून एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. या कवितेचा व्हिडीओ उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने ट्वीट केला. हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. या कवितेचा व्हिडीओ ट्वीट करताना उद्धव गटाच्या राज्यसभा खासदाराने 'कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र' अशी प्रतिक्रिया शब्दांच्या स्वरुपात ट्वीट केली आहे.
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली